एक घास चिऊचा
एकविसाव्या शतकात मोबाइल चा उदय झाला आणि त्यासोबत चिमन्यांचं अस्त सुरू झाला, गावाकडे घराघरात फोटोमागे गवत जमा करून किलबिलाट करणाऱ्या चिमण्या नाहीश्या होऊ लागल्या. जुनी कौलारू घरे पाडून सिमेंट ची घरे आलीत, त्यामुळे घरातील मोठे फोटो, भिंतीवरील आरसे नाहीसे होऊ लागले आणि चिमन्याचे आवास संपू लागले. कोणाला याचे कारण लवकर समजले नाही, पण ज्या चिमण्यामुळे माणसे सकाळी लवकर उठायची ती आता मोबाईलचा गजर लावू लागलीत. त्या कर्णकर्कश गजर चा आवाज ला वैतागून त्यात पण कृत्रिम पक्ष्यांचे आवाज घालून गजर वाजवू लागले. चिमण्या कमी झाल्या आणि छोटे कीडे, गोमी, जंत आळ्या वाढू लागले ज्यांना चिंमन्या खात असत. आज 2020 वर्षात पूर्ण जगात निसर्ग ना प्रकोप धाकवला आणि कोरोना ना ने सर्वाना घरात बंदिस्त करून टाकले, फक्त पक्षी आणि प्राणी मोकळे फिरत आहेत. या कमी होणाऱ्या चिमन्यांसाठी काहीतरी घरटे असल्याशिवाय यांची संख्या वाढणार नाही, हे सर्वांना जाणवत होते पण कार्य कधी करायचे यासाठी वेळ मिळत नव्हता. तो वेळ या कोरोना ने दिला आणि महू गावात या चिमण्यांची घरटी बनवायची ही संकल्पना श्री.अविनाश रघु...