Posts

Showing posts from May, 2023

सातारची आजी

              सातारची आज्जी  यावर्षी मुंबईत भयंकर उकाडा होता. मुंबईतील चाकरमनी जसा वेळ मिळेल तस आपल्या गावाकडे जाऊन राहायचा प्रयत्न करत आहेत. मी पण कुटुंबासोबत गावी गेलो. आठवड्याची सुट्टी संपली पण परत निघायला पाय निघत नव्हता. मग गावारूनच साईट वर जायचे ठरवले. प्रवास जास्त होत होता पण गावी राहायचा आनंद मिळत होता. गावावरून मुंबई तिथून जामनगर, परत मुंबई आणि रात्री गावची ट्रॅव्हल पकडून परत गावी अशी पहिली साईट केली.  4 दिवस राहून परत गावावरून सोलापूरची एक साइट करायचं  ठरवलं. सातारा ते सोलापूर ST ने जायचं ठरवलं. माहिती काढली तर समजलं महाड-महाबळेश्वर-सातारा-सोलापूर- अक्कलकोट अशी एक ST चालते. सकाळी साडेनऊला पांचगणी आणि साडेदहा ला पाचवडला पोहचते. पाचवडला जाऊन ST पकडली.  गाडी फुल भरली होती सीट भेटेल की नाही ही शंका होती, वाहकाला (कंडक्टर) विचारले, तो म्हणाला "सातारा पर्यंत उभे राहा सातार मध्ये जागा होते." सातारा पर्यंत उभे राहिलो. सातारा मध्ये गाडी खाली झाली. खिडकीच्या बाजूची सीट पकडली. सातारामध्ये परत गाडी फुल्ल झाली. एक वयस्कर आजी, कपाळावर क...

व्व्हळीच आंबे

                  -----*व्हळीच आंबे*-–---- काय मित्रांनो कळलं का व्हळ म्हणजे काय? अगोदर व्हळ म्हणजे काय ते सांगतो. व्हळ म्हणजे ओळ (रांग) सातारा भागात एका ओळीत किंवा रांगेत उभे राहणे किंवा काही गोष्टी तशा ठेवणे याला व्हळीत म्हणतात. असेच आमच्या महू गावात मागच्या आळी ला अशोक बाबा च एक व्हावर आहे त्याच्या बांधावर 5 मोठी आंब्याची झाडे एका व्हळीत उभी होती. 5 ही झाडे अवाढव्य होती. आणि विशेष म्हणजे प्रत्येक आंब्याची जात ही वेगळी होती. एक शेंदरी, दुसरा ढोल्या- गोटी, तिसरा काळा, चौथा शेंबडा आणि एक गावठी फळ.  त्यांची नावे ही अनोखी होती, पहिला जिथे उभा होता त्याच्या बाजूला कळक होती म्हणून तो कळकितला, दुसरा काळा रंगाचा म्हणून काळा, तिसऱ्या च खोड खूप मोठं आणि जाड होत म्हणून तो ढोल्या चौथा होता तो शेंद्री फळाचा म्हणून शेंदरया आणि पाचवा शेंबड्या फळाचा म्हणून शेंबड्या.  खूप जुनी झाड होती ही. लहानपणी उन्हाळ्यात या झाडाखाली दुपारची मुलांची गर्दी असायची. वेगवेगळे आंबे आणि त्यांचा पिकण्याचा काळ ही वेगळा होता म्हणून पूर्ण उन्हाळा ते आखड येई पर्यंत ही झाड...

गावच मंदिर काम

  नमस्कार,      गाव म्हटलं की अनेक विचार अनेक अडचणी आणि अनेक प्रकारचे समज गैरसमज येत जात असतात. आपलं गाव ही त्याला अपवाद नाही.   सध्या गावात काळभैरवनाथ मंदिर चे जीर्णोद्धार काम चालू आहे. जरी सर्व गाव मिळून हे काम करत असले तरी सध्या दोन विचार प्रवाह तयार झालेले दिसत आहेत. मंदिर तयार करायचे हा हेतू सर्वांचा आहे परंतु काही वयक्तिक किंवा  भावकीचे वाद विवाद, काही गैरसमज काहींची दुखवलेली मने यातून एक गट तयार झाला आहे. हे वरील समस्या वर ग्रामसभा लावून त्यांना शंकांचं निरासन करून हवंय.  दुसरा गट मंदिर कामात दुसरं काही विषय नको फक्त मंदिर या विषयावर बोलावे या मताचा झाला आहे अस दिसत आहे.  तटस्थ विचार केल्यास मंदिर तयार व्हावे हे सर्वांना वाटत आहे. या कामात ज्यांना जमेल त्यांनी वेळ देणे गरजेचे आहे. तासाठी स्वयं तयार व्हावे लागते. ज्यांना वेळ जमत नाही त्यांनी वर्गणी देऊन आपली जबाबदारी आणि कर्तव्य पूर्ण केले पाहिजे. परंतु झालेल्या कोंडीमुळे सर्वसहभाग होत नाही आहे.  यातून मला एक मार्ग दिसत आहे, त्यासाठी दोन्ही बाजूने एक एक पाऊल पुढे येणे गरजेचे आहे. त...

बापू पोकळे

  *हार न मानणारा बापू  पोकळे* प्रत्येकाची जगण्याची एक पद्धत असते.कोणी नियोजन करून जगतो कोणी नियोजन चुकलं की निराश होतो कोणी परत लढतो आणि कोणी काहीच नियोजन न करता येणाऱ्या परिस्थितीलाच नियोजन बनवततात.   हातात काही असो व नसो पण बिनधास्त जगणे काय असते ते शिकवणारा असा अवलिया म्हणजे आमचा *बापू.. (दत्तात्रय) पोकळे* . तसा जन्माने तो धनगर पण जात कधी याने अंगाला चिकटवून घेतली नाही. कराडच्या वडूज मध्ये बिरुदेव पोकळे यांच्या घरी 1977 साली याचा जन्म झाला.घरात कोणीही शिकलेले नव्हते. वडील मुंबई मध्ये माथाडी कामगार होते. यानेही गावी कसलेही टेन्शन न घेता जेमतेम शिक्षण शिक्षण घेत दहावी पूर्ण केली आणि मुंबईला येऊन काम धंदा शोधू लागला. 1996 पहिलीच नोकरी लागली ती गेम क्लब मध्ये. तेव्हा तीन पत्ती, रम्मी, लुडो यांचे अनेक क्लब मुंबई मध्ये होते. कॅश काउंटर सांभाळायचे काम होते, वरचे पैसे खूप येत असायचे पण स्वार्थाने ते कमवावे अशी कधी बापू ची भावना नाही झाली. कामापूरत घायचे आणि बाकी मिळेल ते उडवायचे असा बापू चा स्वभाव. चांगले काम चालू होते पण घरच्यांना त्या बद्दल काही माहीत नव्हतं आणि याच लग्...

परडा

                      *परडा* विसाव्या शतकात महाराष्ट्रातील खेडी पाडी म्हटली आठवातात ती जनावरे, गुर, त्यांचा गोठा, गोठ्यात झोपायला लाकडी फळ्यांची खाट आणि त्यावर वाकळा, गंजी, लाकडाचे माच, शेनीचा माच, अंघोळीची चिप, आणि त्याखाली तयार झालेली, केळी, पपई, सीताफळ यांची बाग.  अशी बाग आणि गुरेढोरे यांनी भरलेली जागा म्हणजे  *परडा*. काही ठिकाणी मिरच्या शेती ही या परड्यात केली जायची.  शेतकऱ्याची हक्काची, समाधानाने निवांत बसायची जागा म्हणजे परडा.  आयुष्याची जमपुंजी मोजण्याची जागा म्हणजे परडा.  शेतकरी घरात कमी आणि परड्यात जास्त वेळ भेटायचा. घराच वैभव त्या परड्याच्या भरभराटीवरून दिसून यायचे.    आनंद पवार याचं चिलबल या ललित कादंबरी मध्ये परडा हा धडा वाचला आणि वडिलांना ऐकवला, त्यांनी ज्या आठवणी सांगितल्या त्या ऐकून मन भरून आले.   गावाकडे आलो आणि एक परडा दिसला. आठवण म्हणून त्याचा व्हिडिओ बनवून इथे देत आहे. नक्की बघा आणि आनंद घ्या.  https://youtu.be/xVAcq0aQbAs धन्यवाद  जयंत जगताप 7738022343