Posts

Showing posts from June, 2021

धंदा व नोकरी

धंदा व नोकरी  काही छोटे व्यावसायिक, धंदेवाले, आपला व्यवसाय सुरू केला की नोकरी म्हणजे गुलामी असे बोलत असतात आणि ते म्हणजे स्वतंत्र राजे अशा थाटात समाजात बोलत असतात. धंदा नक्की करा, तुमच त्यासाठी अभिनंदन केलंच पाहिजे. परंतु नोकरी वाले गुलाम नसतात, त्यासाठी ते वेतन घेतात, ते पण आपले कला गुण, स्किल्स, knowldge विकत असतात.   गुलाम म्हणजे, मना विरुद्ध कोणतेही वेतन न देता करून घेतलेलं कष्ट असत. त्यात त्यांना काहीही अधिकार नसत. फक्त रोजच जेवण ते पण मालक देईल ते असायचं.  आज जगातील 40% जनता काम करते जे धंदे चालू आहेत तिथे काम करून वेतन मिळवने आणि तो धंदा मोठा करणे याला नोकरी म्हणतात. काही धंदेवाले याला गुलामी म्हणत असतात. स्वतःचा व्यवसाय नक्की करा पण नोकरी करून देश सुरक्षित ठेवतो तो जवान, शेतात बिगारी करून बागायतदारची बाग फुलवतो तो बिगारी पण नोकरी करतो. सर्व मोठे धंदे या नोकरदारमुळे चालू असतात. कोणताच धंदेवाले ह्या हुशार,  skilled नोकरदारशिवाय व्यवसाय मोठा करू शकत नाहीत. धंदा करायला लागणारे समान आणि तयार होणारे प्रॉडक्ट विकायला मार्केटिंग, सेल्समन, सर्विस, सप्लाय चैन यात ...

वरात

                               *वरात*   लग्नसमारंभाला जोडून येणार किंवा लग्न समारंभातील शेवटचा कार्यक्रम म्हणजे वरात.  "लग्न छोटे करू पण वरात जोरात काढू म्हणजे गावाला कळेल" असे म्हणणारा पण एक वर्ग असतो, नवरदेवाचे मित्र मंडळींना लग्ना पेक्षा जास्त आस असायाची ती वरातीची.  2005 च्या अगोदर वरातीचे स्वरूप वेगळे होते. लग्नच्या दुसऱ्या दिवशी

पुन्हा सुरवात

                  *पुन्हा नवीन सुरवात*  31 मार्चला कोची वरून मुंबईत आलो आणि महाराष्ट्रात दुसरे lockdown चालू होणार याची चर्चा सुरू झाली होती. दुसरी लाट हा हा म्हणता राज्यच्या उंबरठयवर पोहचली होती. पहिली लाट अचानक आली होती आणि लोकडोवन देखील अचानक केले गेले होते, तशी ती गरजच होती.  यावेळी मात्र अजून  नीट नियोजन करून लोकडोवन ची गरज होती आणि नियोजन ही तसेच चालू होते.  सर्विस इंजिनियर म्हणून जुलै 2009 पासून ते 2020 पर्यंत गेल्या 12 वर्षात मी सतत फिरत होतो. जास्तीत जास्त 1 महिना मी घरी थांबलो आहे अन्यथा 10-12 दिवस साईट मग 8-10 दिवस घरी, असे गोल चक्र चालू होते. गेल्यावर्षी संचारबंदी लागू झाली आणि लगेच गावी गेलो होतो. गावचे वेगळेच जीवन अनुभवायला भेटले होते.(त्यावर मागे लिहले आहे). या वर्षी गावाकडे ही दुसरी लाट पसरत होती त्यामुळे मुंबई सोडून बाहेर गावी जाणे योग्य नाही हे ओळखुन मुंबईत राहायचे ठरवले. तरीही सुरवातीला मनाची चलबिचल होत होती. गाव की मुंबई असा शिवशीविचा खेळ मनात चालू होता. जसे एखाद्या बंद खोलीत मांजर अडकल्यावर सुरवातीला द...