Posts

Showing posts from June, 2023

सार्वजनिक कार्य

     *माझा अनुभव सार्वजनिक कामाचा* सार्वजनिक कार्य चालू करताना विरोधक हे असतातच. त्यांना कामाचे स्वरूप सांगून कामाची सुरुवात करणे गरजेचं असते पण अस सांगून ही विरोध राहत असेल तर जास्त चुचकरात बसणे योग्य नसते. सार्वजनिक कार्य हे सार्वजनिक सभा(मिटिंग) घेऊन पुढे नेले जाते, ज्यांना सहभाग घ्यायचा असतो ते अशा मिटिंग ला हजर राहून सहभाग घेतात. एकदा कार्य चालू झाले की वयक्तिक हेवेदावे सोडून हाती घेतलेले कार्य कसे पूर्ण होईल त्यावर लक्ष देणे गरजेचे असते. जुन्या चुका परत परत काढत बसणे म्हणजे चालू कार्याचा वेग मंदावणे असते. त्यामुळे भविष्यात नवीन कार्य हाती घेताना कार्यकर्ते कचवतात. सहसा जे कार्यात शामिल नसतात तेच विरोधात उभे असतात. कार्य होताना सहभाग न घेता, नंतर आपले ज्ञान झाडून चुका काढणारे म्हणजे साप मेल्यावर धोपाटे टाकण्यासातखे असते.  सार्वजनिक कार्यात प्रश्न विचारावे पण त्याआधी त्यात सहभाग घ्यावा, करण त्यातच अर्धे प्रश्न सुटून जातात. कार्य पूर्ण होताना शेवटची वीट महत्वाची असते, पण पहिली वीट लावणारा कधीही श्रेष्ठ असतो. कारण सुरवात करणे कधीही धाडसाचे असते. महाभारत मध्ये श्रीक...

कर्मवादी

                    कर्मवादी कर्मवादी जे असतात त्यांनी आपले कर्म करत राहायचे असते. ते करताना कधी कधी चुकभुल होत असते म्हणून थांबायचं नसत. त्यातून शिकून परत पुढे चालायचं असत.  आपल्या कर्माचा हिशोब आपण नाही ठेवला तरी आजकाल समाजात असे काही प्रवृत्ती आहेत जे तुमच्या कर्माचा हिशोब ठेवत असतात. त्यांचं एखादं कर्म असत आणि तेच तेच परत परत सांगत बसतात. पण दुसऱ्याच खूप कार्य असल तरी त्यातील फक्त चूका काढायची काम हे लोक करत असतात. स्वतः काही सार्वजनिक कार्यात सहभागी नाही होणार पण हा नको, तो नको, काही करण्याच्या आधी आम्हाला विचारा अशी यांची वृत्ती असते.  काही सकारात्मक घडले की त्यात काहीतरी उपदेश असे द्यायचे की जस काही बरोबर आणि चूक फक्त यांना कळत.  जणू काहीं दुसऱ्याच पाप-पुण्याचा हिशोब ठेवायच काम यांनाच येत. दुसऱ्याला नाव ठेवून  मग ते सार्वजनिक किंवा वयक्तिक कामावरून असो, की वंश परपरेवरून असो. अशा लोकांचा इतिहास हा पळपुटेपणाचा असतो.  दुसऱ्यांना नाव  ठेऊन  स्वतः मोठं होण्याची स्वप्न बघणारी ही प्रवृत्ती असते.  अ...

भारत बांगलादेश बॉर्डर- कोलकाता ते जयंतीपुर (petrapol)*

     *भारत बांगलादेश बॉर्डर-  कोलकाता ते जयंतीपुर (petrapol)*   गोष्ट आहे 1850 च्या काळातील. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी ने कोलकाता मध्ये पाय रोवले होते. ब्रिटिश सेना आणि काही अधिकारी आपल्या बायका पोरांसह कोलकात्यात येत होते. अधिकाऱ्यांचे कोलकाता ते ढाका येणे-जाणे वाढले होते. कोलकाता ते ढाका असा रस्ता तयार झाला होता. पावसाळा संपला की बैलगाड्या, घोडगाड्या आणि गुलाम चालत असा चालू होतं असे. प्रवास लवकर संपवावा म्हणून दिवसभर न थांबता प्रवास करायचा निर्णय झाला होता. पण भारतात दुपारचे ऊन खूप जास्त असते त्यामुळे उष्माघाताने अनेक जनावरे, घोडी, बैल आणि आणलेले गुलाम दगावत होते. व्यापार वाढवायचा दबाव वाढत होता.        मग यावर उपाय म्हणून एक वनस्पती विशेष अधिकाऱ्याने उपाय सुचवला. रस्त्याच्या दुतर्फा अशी झाडे लावली की ती उंच वाढतील आणि सभोवताली पसरत जातील. पण याना विशेष अस काही फळ येणार नाही याची काळजी घेतली गेली. स्थानिक भारतीय कामगार आणि हे ब्रिटिश सैनिक यांनी या रस्त्यावर दुतर्फा इतकी झाडी लावलीत की उन्हाळ्यात सुद्धा पूर्ण रस्ता सावली झाली राहू लागला. का...

आराध्य 12 जून 2023

आज 12 जून 2023. आज आराध्यची शाळा सुरू होणार होती पण काही कारणाने 2 दिवस पुढे ढकलली गेली. तसेच आज 12 वाजता त्याचे etc मधील थेरेपी सेशन चालू होणार होते. मी माझं ऑफिसच काम आटोपून त्याला घेऊन जाणार होतो. मनीषा आमचे डब्बे तयार करायच्या घाईत होती. जेवण बनवत होती. त्यात ही अगोदर मी त्याला खेळवले होते आणि नंतर मनीषा त्याला खेळवत होती. ते करत करत ती 2 मिनटं किचन मध्ये गेली आणि आराध्य चिडला. त्याला आमचा वेळ हवा होता.  अगोदर तो मुख्य दरवाजाकडे आला आणि मागच्या बाजूने डोकं आपटलं आणि तसाच पळत जाऊन खिडकी च्या ग्लास वर डोकं आपटलं. तो पळत गेल्यामुळे त्याचा वेग आणि फोर्स ने सरळ काच फुटली खळळ असा आवाज झाला. आराध्य काच फुटून, उलटा गॅलरीत डोक्यावर पडला होता. मी लगेच पळत गेलो. मांडीत एक काच घुसली होती, ती कशी तरी मी ओढून काढली आणि आराध्य ला उचललं.  काचेवर डोकं आपटलं तिथे लागलं होतं, डाव्या कानाच्या मागे कापलं, डाव्या पाठीवर खोल जखम झाली, मांडीला लागले, आणि सर्वात जास्त उजव्या हाताच्या करंगळी च्या बुंदयात मोठी जखम झाली होती. अंगावर काचेचा चुरा पडला होता. कसा तरी त्याला बाथरूम मध्ये नेला आणि पाण्याने...