अफवांमधून तयार झालेले वलय
अफवांमधून तयार झालेले वलय अजून पर्यंत अजित दादा अनेकांना वैयक्तिक आवडले नव्हते त्याचं नाव आलं की समोर 70 हजार करोड आणि धरणात मूतन एवढच समोर येत होत.. पण ते असे अचानक गेले हे ऐकल्यावर मनात एक चर्र होऊन जात तस वाटलं दादा गेल्यावर लोकांच्या आलेल्या प्रतिक्रिया आणि लोकांनी ओक्साबोक्सी होऊन फोडलेला हंबरडा पाहून मन व्याकुळ झाल.. वाटलं लाखाचा माणूस गेला हे सर्व आता realize होतंय माणूस किती कामाचा होता यातून मनात विचार आला.. अजित दादा खरे होते काय आणि त्यांना न ओळखणाऱ्या फक्त एखाद्या भेटीतून किंवा ऐकीव माहितीवरून लोकांनी त्यांची एक निगेटिव्ह इमेज तयार केली होती. दादा तोंडावर जे काय असेल ते बोलायचे. काम होत असेल तर हो नाहीतर नाही. यातून काहीजण दुखवत असणार आणि अशी माणसं मग स्वतःच्या मनाने अजित दादा लय उद्धट, लोकांची त्यांना कदर नाही, समाजात, राजकारणात कसे वागावे हे त्यांना कळत नाही अशा अफवा उठवत बसणार. समाजात सुद्धा काही स्वार्थी, समाजकंटक, दुसऱ्याला नावे ठेवली की आपण श्रेष्ठ होतो असा गैरसमजात रहाणारी वृत्तीची माणसे असतात. ज्यांनी एखाद्या व्यक्तीसोबत क...