सकाळचा प्रवास नेहमीच आल्हाददायक असतो. मनाला एक नवीन चेतना देऊन जातो. मन अगदी चहूदिशांना फिरून येते आणी एखद्या आठवणीत अगदी खोल खोल जाऊन आठवणीचा गाळ ढवळुन येते. आजही असाच पहाटे 4:30 वागतात उठलो आणी बॅग घेऊन रेल्वे स्टेशनकडे चालत निघालो. वातावरणात शांतता कती असू शकते हे अनूभवले. किती गारवा असतो हवेत. आकाशात सोनेरी भगव्या छटा दिसत असतात आणी सफेद झालेला चंद्र आपल्या घराकडे निघालेला असतो. मी पण तेलंगाणातील मंचेरीअल गावातून आगगाडी पकडून हैदराबाद मग विमानाने मुंबईकडे माझ्या घरा कडे निघालो. रस्ता तसा फक्त 200 मिटर चालायचा होता पण हा संपूच नये असे वाटत होते. एका कोपर्यात एक चहा वाला चहा उकळवत होता. बाजूला पेपर वाला पेपर मध्ये पूरवणी लावत होता. दूर उंचावर स्टेशन दिसत होते. चहा पियायची ईच्छा मी काही टाळू शकलो नाही आणी एका कपात चहाचे घोट घेत मोबाईल वर मेसेज वाचू लागलो. विचारून वरचा "एक दिवस पाणी संपेल" हा लेख वाचला आणी मन इतीहासात गेले. आपल्याला आपल्या ठेव्याची किंमतच नाही. पाणी असो नैसर्गिक संपदा असो प्राणी असोत आपली खाद्य संस्कृती असो आयुर्वेद असो योगा असो प्राचीन ठेवा अस...