Posts

Showing posts from November, 2022

मला तुझ्या इतकं जवळ यायचं आहे की..

मला तुझ्या इतकं जवळ यायचं आहे की.. तुझ्या डोळ्यात माझ्या डोळ्यांचं प्रतिबिंब बघायचं आहे, मला तुझ्या इतकं जवळ यायचं आहे की.. तुझ्या श्वासात माझा श्वास मिसळून जावा, मला तुझ्या इतकं जवळ यायचं आहे की.. तुझ्या ओठांची लिपस्टिक माझ्या ओठांवर लागेल मला तुझ्या इतकं जवळ यायचं आहे की.. तुझ्या हृदयाची स्पंदन माझ्या ह्रदयाला जाणवतील मला तुझ्या इतकं जवळ यायचं आहे की.. तुझ्या अंगावरचा शहारे माझ्या अंगावरील शहरामध्ये अडकतील.. मला तुझ्या इतकं जवळ यायचं आहे की.. तुझ्या केसांची बट माझ्या कानावर येईल मला तुझ्या इतकं जवळ यायचं आहे की.. 2 जीव 1 शरीर बनून जाईल.. मला तुझ्या इतकं जवळ यायचं आहे....

हे विसरू नका

             *हे विसरू नका*      नेहमीच सुखाच्या शोधत धाऊ नका.  रस्ता चांगलाच असला पाहिजे  हा अट्टाहास धरू नका..           हिरवेगार रस्ते, सावली देणारी झाडे,  यात जमेल इतकं नक्कीच चाला पण, तोच रस्ता आयुष्यभर असेल असं गृहीत धरू नका.  चढ-उतार, खळगे, अवघड वळणे आणि घाट,              यात ही स्वतःला सिद्ध करा...  कधी कधी रस्ता संपला अस वाटेल तेव्हा,  नवीन वाट तयार करण्याची संधी चुकवू नका..       आपला वेग इतका ही वाढवू नका की, U turn ची गरज पडली तर घेता येणार नाही..    रुक्ष, परिस्थितीने तापलेले रस्ते ओलांडत,      जेव्हा सुखाची विहीर सापडते तेव्हा,  ते आनंदाचे पाणी सर्वात जास्त गोड लागते,                    हे विसरू नका..    आणि हो सोबत अनुभवाचे गाठोडे असलेले, आपले जुने जाणते आपले सोबत आहेत  तो पर्यंत कोणतही संकट आपल्याला तोडू शकत नाही ...

भुरळ घालणारा सोलापूर

        भुरळ घालणारा जिल्हा सोलापूर     लहानपणी शाळेत असताना सगळ्यात पाहिले कोणत्या देवीचे नाव वाचनात आले असेल तर ते म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी देवी.. स्वराजाच प्रवेशद्वार आणि त्यावर अफजल खानने केलला पहिला आघात. पण जागृत देवस्थान अशी मिटत नसतात ती धगधगत्या ताऱ्याप्रमाणे अजून जास्त तेजस्वी होत जातात. असच महत्व आहे आई तुळजा भवानीच..  तिच्या बाजूलाच धाराशिव मध्ये आहे येढाई देवी. छोट्याशा पठारावर वसलेली पण मोठं महात्म्य असलेली येढाई देवी मंत्रमुग्ध करते. तिच्या पठाराला वेढा मारताना मन एक वेगळ्याच विश्वात जाते. परत  सोलापुरात आलं की स्वामींच दर्शन घेतल्या शिवाय पाय निघत नाही. "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे". या एका वाक्यता अफाट अशी मानसिक शक्ती आहे. स्वामींचा आशीर्वाद घेऊन मुंबई कडे पाय वळले की आपोआप आपण खेचले जातो ते पांडुरंगाच्या भक्तीत. निष्पाप, साधीभोळी, सर्वांना समावणारी अशी पांडुरंगाची भक्ती आणि वारकऱ्यांचा प्रेम बघायचं असेल तर पंढरपूर शिवाय पर्याय नाही. देवाची पंढरी म्हणतात ते उगाच नाही याचा प्रत्यय आला. 5 किलोमीटर कधी चाललो कळले नाही, भूक विस...