माझे गाव महू गाव
नमस्कार, मी श्री. जयंत जगताप, गेले 28वर्ष नवी मुंबईत राहत आहे, नवी मुबईत माझं शिक्षण झालं आणि इथलाच मी स्थायिक झालो. मार्च मध्ये आलेल्या कोरोनाची साथ आणि संचारबंदी मुळे मार्च ते ऑगस्ट असे सलग 5 महिने गावी राहायला मिळाले आणि गावाचा पूर्ण निरीक्षण करायची संधी मिळाली. ते इथे मांडत आहे. मूळ गाव सातारा जिल्ह्यात जावली तालुक्यात कुडाळी नदीच्या किनाऱ्यावर आणि महाबळेश्वर पांचगणी डोंगर रांगांच्या पायथ्याशी वसले आहे. गावची आजची लोकसंख्या लक्षात घेता गाव पाचशे ते सहाशे वर्ष पूर्वी वसले असावे वाटते. गावात मुख्य देवता काळभैरवनाथ आहे. या देवळाचा जीर्णोद्धार 1864 मध्ये झाला आहे अशी मंदिरावर नोंद आहे. या सोबत गावात, विठ्ठल रुख्मिणी, श्रीराम मंदिर आणि गावच्या वेशीवर बनातील काळभैरवनाथ मंदिर आहे. गावची लोकसंख्या 1200ते1500च्या आसपास आहे. तरीही करहर भागातील मोठ्या गावच्या यादीत गावचे नाव येते. गावात मुख्यतः गोळे आडनावाचे सर्वाधीक 90% लोकसंख्या आहे या सोबत जगताप, शिंदे, पवार, मस्कर, भगत, खुडे, कांबळे या आडनावाची लोकसंख्या 10% आहे. गावात 5 कुळे असून ती मोकाशी, पाटील, जागृती, प्रगती व नवलाई भावकी ...