Posts

Showing posts from August, 2021

आशावाद

पुन्हा नवीन रस्ता आपण गाडी चालवत असताना मोबाईल मधील गुगल मॅप वापरतो. गुगल मॅप ने चालताना जर ड्राइवर गाडी मॅप प्रमाणे वळण न घेता पुढे गेला तर गुगल मॅप चा निवेदक रागवत नाही. चुकीवर बोलत बसत नाही तर मॅप "#रिरूट" करते. पुन्हा योग्य आणि जवळचा मार्ग गुगल मॅप सांगतो. जीवनातील असंच वळण चुकलं तर त्याची #चूक काढत बसण्यापेक्षा आपणही स्वतःला किंवा आपल्या संपर्कातील लोकांना "#रिरूट" करायला भाग पाडलं पाहिजे. झालेल्या चुकांवर भर देऊन निराशामय वातावरण तयार करण्यापेक्षा "#रिरूट" करून आशादायी वातावरण तयार करणे कधीही योग्य राहील.

मृत्यू

मृत्यू  मस्त, मृत्यू अटळ आहे पण आपल्याला फक्त तो जेवढा पुढे रेटता येतो तेवढा रेटायचा. त्याला जीवन म्हणतात आणि लढणे म्हणतात.  हॉलिवूड चा एक चित्रपट आहे gladiator. त्यात मॅक्सिमस या सेनापतीच्या कुटुंबाला मारून टाकले जाते आणि त्याला ही मारत असतात पण तो वाचतो आणि एका गुलामांच्या कबिल्यात सापडतो.  तिथे त्याला मृत्यू हवा असतो, तेव्हा त्याचा साथीदार म्हणतो, प्रत्येकाला मरायचे आहे. तुझे बायका पोर स्वर्गात तुझी वाट बघत असतील पण तुझी वेळ आज नाही आहे. तुला इथे अजून खूप काही करायचं आहे.  "You will dia but not today, not now, your time has not come". यातून मी शिकलो, प्रत्येकाची वेळ असते, ती चुकत नाही, तोंपर्यंत आपण जगायचं ते पण आनंदात, आपल्या धुंदीत.  मृत्यू  प्रत्येकाला दिसेल तसा आहे. कधी तो दिसतो, कधी लपंडाव खेळतो, कधी हुलकावणी देतो, कधी हवासा वाटतो पण येत नाही, कधी आपण दूर पळतो पण तो शाश्वत आहे हे विसरतो.

दोस्ती

Image
       दोस्ती दिवस 1-     गेल्यावर्षी मे 2020 मध्ये लोकडोवन मध्ये गावी राहिलो होतो. असच एक दिवस खास मित्रासोबत डीपी (गावाबाहेरील ट्रान्सफॉर्मर हाऊस जे dp नावाने प्रसिद्ध आहे.) च्या खालून शिंदेच्या घराकडून गळत्याच्या रस्त्यावर चाललो होतो. समोरून गावातील काही ओळखीचे तरुण आले.ते अनेक मव्ह (मध) काढून आले होते. मधाची भरलेली किटली घेऊन एक जण समोर आला. मध अतिशय औषधी असते आणी ते असे भेसळमुक्त असेल तर खूपच भारी. मी सहज विचारले अरे मध मिळेल का औषधासाठी.  किटली वाला संकोचला. तो नाही पण म्हणू शकत नव्हता, त्याने पुढच्या वर ढकलले. आम्ही जे समजायचे ते समजले आणि पुढे निघून गेलो.  दिवस 2- लोकडोवन चालू होते आणि रिमोट लोकेशन वरून म्हणजे गावी विठ्ठल रुखमाई मंदिरात बसून काम चालू होते. आज दिवस खूप व्यस्त होता. संध्याकाळच्या 4 वाजले होते. काम चालू होते आणि मित्राचा फोन आला. "जय कुठे आहेस" म्हटले "कामात आहे", समोरून हक्काचा आवाज आला "काम सोड आणि घरी ये" आपल्याला बाहेर जायचय.  मी कसतरी काम आटपून निघालो. घरी पोहचलो तर हा एक विळा, मोठी दोरी, एक पातेलं, 2 टॉवेल घेऊन तया...