Posts

Showing posts from March, 2024

मोकाशी गेट टुगेदर प्लॅनिंग

मोकाशी गेट टुगेदर प्लॅनिंग  सर्वांनी दुपारी ४ वाजता भैरवनाथ मंदिरात जमणे, देवाला नारळ फोडणे आणि मग स्थळाकडे जाणे.  पुरुष ग्रुप photo- 60 वर्ष वरील, 40ते 60 च ग्रुप  30ते 40 च ग्रुप आणि young group.  तसेच महिलांसाठी याच प्रकारे फोटो सेशन.   गणेश पूजन, शिवाजी महाराज प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन  नितीन गोळे जॅक्सन, अमोल गोळे गुरू, सुनील शिंदे, राजेंद्र विष्णू गोळे. जय: सकारात्मकता निर्माण करणे... मनाला प्रसन्न वाटेल असे काम करणे... हे आपल्या हातात आहे. आधी त्या दृष्टीने विचार नंतर त्याला मूर्त रूप देण्यासाठी आचार महत्वाचे आहेत. त्या दृष्टीनं एक एक पाऊल टाकायचं हे आपलं काम आहे. हा स्नेहसंमेलन सोहळा त्या सकारात्मक वाटेवरील एक मैलाचा दगड आहे.  शब्दांमुळेच जुळतात मनामनाच्या तारा आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पटकन पारा. शब्दच जपून ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दांमुळेच तरळते कधी कधी डोळ्या मध्ये पाणी. कोणतीही गोष्टीत शेवटचा माणूस सहभागी असावा..आज आपण जमलोय ते शेवटचा माणूस कोण आहे ते शोधायला.. 😀 आदी: म्हणूनच जो शब्द जिंकेल तो मन जिंकेल, आणि जो मन जिंकेल ...

भीती हि खरी नसते fear is not real

    #cinema gulli #सिनेमागल्ली  Fear is not Real..  जो घाबरला तो संपला.  जो डर गया वो मार गया.. डर के आगे जीत है..  ज्याने भीती वर मात केली त्याने अर्धी लढाई जिंकलेली असते असे अनेक सकारात्मक संवाद आपण ऐकलेले आहेत. भीती वर मात करा म्हणजे तुम्हाला यश मिळेल अस सांगितलं जातं आणि अनेक जण त्यासाठी प्रयत्न ही करत असतात.. पण खरोखर एकदा भीती संपली माणूस काय करू शकतो यासाठी हॉलिवूड मध्ये एक खूप सुंदर सिनेमा बनवला गेला आहे. असच एकदा टीव्ही वर चॅनल स्क्रोल करताना स्टार मुव्हीज वर हा सिनेमा चालू होता आणि बघतिला. सिनेमाचा आशय होता भीतीवर मात केली की माणूस कसा यशस्वी होतो. मग त्यासाठी तुम्ही ताकतवान असणे गरजेचे नसते. धाडसी असणे गरजेचे असते.  सिनेमाच्या ट्रेलर मध्ये खूप छान संवाद आहे.. fear is not real.. danger is real but fear is product that you brought. It's your choice to be live with fear or face the real. भीती ही आपण आणलेली असते, संकटे खरी असतात त्यांच्याशी दोन हात केले की आपण जिंकू शकतो पण भीती ही काल्पनिक असते ती संपवता येत नाही तिला संपूर्ण नाकरावी लागते....

women's day

 women's Day महिला दिवस  8 मार्च महिला दिवस. माझ्यासाठी खास महिला म्हणजे माझी अर्धांगिनी, सहचारिणी, माझी पत्नी.  मला नेहमी स्पेशल फील करून देणारी. नेहमी पाठीशी उभी राहणारी.  माझ्यासाठी ती खास आहेच पण आई म्हणून मी ओळखत असलेली सर्वश्रेष्ठ स्त्री आहे ती.  मातृत्व ला दैवी शक्ती प्रदान करतात त्या हिच्या सारख्या स्त्रिया. आपलं सर्व आयुष्य एका मुलभोवती केंद्रित करून त्या मुलाला अशक्यप्राय वाटणाऱ्या प्रगतीकडे घेऊन जाण्यात हीचा सिंहाचा वाटा आहे. अशी एक उत्तम गृहिणी, पाक कलेत प्रावीण्य असलेली स्वयंपाकीन, अनेक कलागुणाची असलेली खाण, माझा यशात नेहमी मला मोलाची साथ देणारी.. माझी पत्नी मनोरमा हिस महीलादिनाच्या लाख लाख शुभेच्छा.. 

a day to remember १.३.२०२४

  *A day to Remember ०१ मार्च २०२४*  आठवडाभर भारत-बांगलादेश सीमेवर होतो.  सकाळी-सकाळी आम्ही तिघे कंपनीचे सहकारी शिरीष, निहाल आणि मी व सोबत आमचा बहुआयामी टेक्निशियन श्याम ७ वाजता उठायचे आणि आणि हॉटेल बाहेर समोर असणाऱ्या एका चहाच्या टपरीवर जायचे आणि आमची चाहची ऑर्डर द्यायची. बर. तिघेही वेगळं वेगळं सांगायचो. नीहाल नॉर्मल दूधआणि साखरेचा, शिरीष फक्त दुधाचा बिना साखरेचा, आणि मी लाल चहा साखरे सोबत. बोनगाव तस सीमेवरील तालुक्याचं ठिकाण, सकाळी सकाळी रस्ते मोकळे, मोकळी हवा आणि त्यात गरम चहा. अह..ह..ह..  सुखद अनुभव. मग तयार होऊन सीमेवर जाऊन, पोर्ट हाताळणाऱ्या मुख्य आयपीएस अधिकारी बरोबर मीटिंग करून भारताच्या रक्षणार्थ लागणारी मशीन लावली. बीएसएफ जवान, कस्टम अधिकारी सोबत सिव्हिल च काम करणारी तरुण पोर अस एकंदरीत विविध प्रकारच्या लोकांशी भेटून दुपारी कोलात्याकडे प्रस्थान केले. साईट वर काम करताना सहकारी सोबत असले की काम कसे होऊन जाते कळत नाही. असच मजाक मस्ती करत आम्ही कोलकाता एअरपोर्ट वर पोहचलो. उद्या वाढदिवस आहे आणि मनोरमा सतत माझी वाट बघत आहे तिची उत्कंठा मनाला एक वेगळीच ऊर्जा देत ह...

कोपरी गाव आणि नवी मुंबईकर

 *कोपरी गाव आणि नवी मुंबईस मानाचा मुजरा* भारतात सर्व धर्म अगदी गुण्यागोविंदाने राहतात. जेव्हा जगभर भारत इतका सहिष्णू कसा हे सांगण्यासाठी एक गोष्ट सांगितली जाते की 13 व्या शतकात जेव्हा पर्शियन लोक स्वतःचा जीव वाचवून भारताच्या किनाऱ्यावर आले तेव्हा त्यांना येथील राजा ने जमीन दिली आणि त्यांचा धर्माची पूजा करण्याची त्यांना संपूर्ण परवानगी दिली. ती संस्कृती इथल्या प्रतेक गावात रुजली आहे.  असच दर्यादिल गाव म्हणजे नवी मुंबईतील कोपरी गाव. ३० वर्षापूर्वी यांचे ही गाव नैसर्गिक अधिवासात होतीत. त्यांचेकडे ही शेती, शुद्ध हवा, गुर ढोर, नद्या, झाडी जंगल, मासेमारी व्यवसाय, मोठी घर, आणि गावच वातावरण होत. मुंबई वर वाढतं चाललेला ताण देशाला आणि राज्याला गरज असलेला विकास साधण्यासाठी सरकारने नवी मुंबई स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि मोठ्या मनाने येथील ग्रामस्थांनी आपलं पूर्वापार चालत आलेली आपली जीवनशैली बदलून राज्याची प्रगती आणि विकासाला जागा करून दिली. नवीन नवीन बदल होत गेले, संपूर्ण देशातून लोक इथे येऊ लागले. सर्व जाती धर्म इथे वाढू लागले. त्यांना नवी मुंबई करानी सामावून घेतलं. सुरवातीला गावात स...