Posts

Showing posts from December, 2022

टाटा

   *टाटा - values are stronger then steel* लहान मुलांना विशेषतः मराठी कुटुंबातील मुलांना, अगदी लहानपणापासून माहीत असलेला शब्द म्हणजे टाटा. कोणी पाहुणे निघाले की, त्यांना टाटा करने आणि बोलने सर्वात पहिले शिकवले जायचे. आता इंग्लिश बाय, आणि फ्लाय किस आले. असो..  तेव्हा पासून माहीत की टाटा म्हणजे हात वर करून पंजा हलवणे. नंतर हळू हळू मोठं होताना टाटा ची सुमो मधून प्रवास होऊ लागला. आपण जाताना टाटा करतो आणि ती माणसे त्या गाडीने जातात म्हणून। तिच नाव टाटा ठेवलय असा माझा लहानपणीचा समज होता. मग हळू हळू मोठं होत असताना सगळीकडे टाटा दिसू लागलं. स्टील टाटा, मीठ टाटा, गाड्या टाटा, हॉटेल टाटा, विमान टाटा, चहा टाटा, इलेक्ट्रॉनिक्स टाटा, सॉफ्टवेअर टाटा, फोन टाटा, घर टाटा, सरकारी प्रोजेक्ट टाटा, सर्वात महागडी कार पण टाटा आणि स्वस्त कार पण टाटा, अगदी झारखंड मधील मोठं शहर पण टाटा. भारतातील प्रत्येकाला टाटा नावाचा आदर वाटतो.  फक्त उद्योगक्षेत्रात नाही तर नवीन भरारी कशी घ्यावी ती पण करारी याच सर्वोत्तम उदाहरण म्हणजे टाटा.  जमशेदजी टाटा, दोराबाजी टाटा आणि रतन टाटा यांनी अजरामर केलेल न...

उत्तम

Image
    *उत्तम* उत्तम म्हणजे चांगले, उत्कृष्ट.  एखादे काम मनासारखं झाले की आपण म्हणतो उत्तम झालं. हा झाला शब्दाचा अर्थ. असेच उत्तम नावाचे अनेक व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात. काही कामात ही उत्तम असतात. असाच मला आठवणारा उत्तम म्हणजे उत्तम खुडे. आपल्या आयुष्यात काही व्यक्ती अशा असतात की ज्या कायमस्वरूपी आपल्या मनात घर करून राहिलेल्या असतात. त्यांचा आणि आपला डायरेक्ट काही संपर्क नसतो, संबध नसतो पण ते आपल्या जडणघडणीत एक भाग झालेले असतात. गावची जडणघडण होते ती अनेक विविध प्रकारच्या लोकांच्या सामूहिक कार्यातून, आपापल्या कलेतून आणि गावच्या जपल्या जाणाऱ्या परंपरेतून. गावचे मुख्य 2 सण म्हणजे दसरा आणि ग्रामदैवत काळभैरवाची यात्रा. या 2 सणात गावची पालखी निघते ती बिरमाणेवाडीला तामजाय देवीला कौल लावते आणि परत गावच्या शिवेवरून  फिरत फिरत नदीवर येते, तिथून बनातील मंदिरात विश्रांती घेऊन मग तिथून देव अंगात येतात आणि त्यांना घेऊन पालखी सोबत गावात येते. देव नाचवणे, त्यांना योग्य पारंपरिक संगीत वाजवून पुढे पुढे घेऊन जाणे हे कार्य करतात ते गावातील मांगवाड्यातील पारंपरिक बँड वाले. देव नाचवा...

दिंडी जागर

       *दिंडी* थंडीचा काळ चालू झाला की  मार्गशिष महिन्यात,सातारा जिल्ह्यात ग्रामदैवत यात्रा चालू होतात. आमचे गाव महू. दत्त जयंतीला गावचा सप्ताह म्हणजेच ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू होतो. त्या अगोदर गावकीचे साफसफाई  काम करून संपूर्ण गाव, सर्व मंदिरे, पाण्याची टाकी, रस्ते, बनतील मंदिर स्वछ साफ आणि सुंदर केली जातात. दत्त जयंती पासून 7 दिवस, सकाळी काकड आरती, दिवसभर पारायण, मग संध्याकाळी प्रवरचन, हरिपाठ रात्री 3 तास कीर्तन आणि मग जागर.. असा 24तास  देवाची भक्ती आणि भक्तिमय वातावरण. शेवटचे पाच दिवस पाच भावकयतर्फे गाव जेवण आणि शेवटी दिंडी दिवशी भव्य पालखी मिरवणूक, भजन आणि काल्याचे कीर्तन आणि काल्याचे प्रसादाचे जेवण.  चांगभलं बोला......आ...चांगभलं.....

माझं जीवन

तुकाराम आणि सरसाबाई जगताप यांना एकूण सहा अपत्य. 3 मुले आणि 3 मुली. भिकू, सावित्री, विनायक, जिजाबाई, पार्वतीबाई  आणि शेवटचे पांडुरंग.  3 भावांना एकूण मिळून 10 अपत्य. 6 मुले आणि 4 मुली. मोठे चुलते भिकू जगताप(अण्णा) यांना 3 मुली (मंगल, अनिता, रसिका) आणि 1 मुलगा (अजय). मधले चुलते विनायक (भाऊ) यांना 3 मुले( अतुल, निलेश आणि मानसिंग),.आणि सगळ्यात लहान माझे वडील पांडुरंग (बापू) यांना 1 मुलगी(सुनीता) आणि 2 मुले (जयंत आणि विजय).  वयोमानानुसार दहा जणांमध्ये माझा नंबर 7 वा. आणि फक्त 6  मुलांमध्ये माझा नंबर 3 रा लागतो.  1955 पासून ते 1993 पर्यंत एकूण 20 जणांचे एकत्रित कुटुंब महू गावातील जगताप वाड्यात नांदत होते. वडीलधारे सांगतात की 1978 साली घरात बांधलेला पाळणा 1989 पर्यंत तसाच होता. 10 जण त्याच पाळण्यात झुलून झोपून मोठे झाले आहेत. माझा जन्म 1985 च्या मार्च महिन्यातील शनिवारी 2 तारखेला झाला. आई सांगते माझी पाचवी होळीच्या दिवशी झाली होती. त्याचे परिणाम काय झाले ते पुढें वाचनात येईलच.  त्याकाळी मुलगा होणे म्हणजे खूप आनंदची गोष्ट समजली जायची (आजही परिस्थिती फार वेगळी नाही ...