वाघांचे राज्य
*वाघांचे राज्य * एक खूप जुने जंगल होते, जंगलात वाघांचे राज्य होते, त्यात पण काही चांगले वाघ आणि काही वाईट वाघ होते, जसे सिम्बा सिनेमात असतात तसेच. काही वर्षे त्या जंगलावर वाईट वाघांचे राज्य होते त्यांनी बाहेरील आलेली तरस(hyana) सोबत घेऊन चांगल्या वाघांना कधीच नीट जागून देत नव्हते, खर तर त्या तरसंचा प्लॅन होता तो जंगल बळकवायचे आणि वाघांवर राज्य करायचे. हे चांगले वाघांना समजत होते पण वाईट वाघ काही आळशी वाघांना बसून खायला देत होते आणि त्यांना सोबत घेऊन चांगल्या वाघांचे काही चालू देत नव्हते,त्यामुळे चांगले वाघ काही करू शकत नव्हते. पण या संधीचा फायदा घेऊन तरसांची एक टोळी लपून छपून आळशी वाघांना जे बसून बसून कमजोर झाले होते त्यांना त्रास देत होते आणि त्यांचे लचके तोडत होते. हळू हळू हा त्रास वाढत होता, वाईट वाघ सत्ता टिकवण्यासाठी याकडे दुर्लक्ष करत होते. चांगल्या वाघांनी मग या आळशी वाघांना समाजवलाय सुरवात केली आणि हळू हळू तुमचे कसे हाल होतील ते समजावले. काही आळशी वाघाना हे पटू लागले आणि ते बसून खायचे...