Posts

Showing posts from September, 2021

मास्क

      मास्क मास्क नावाचा एक hollly वूड

*हेरिटेज ट्राम* - *गोळे कन्स्ट्रकॅशन कंपनी*

    *हेरिटेज ट्राम* - *गोळे कन्स्ट्रकॅशन कंपनी* मुंबई, मुंबा देवी च्या नावतून आणि 7 बेटांचे बनलेलं हे शहर काळानुसार बदलत गेले आणि देशाची आर्थिक राजधानी कधी झाले हे कळलेच नाही. मुंबईच्या या अथांग प्रवासात अनेक गोष्टी चा सहभाग आहे. 18 व्या शतकात इंग्रजांची सत्ता असताना हे शहर व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले. काळाची गरज ओळखून 1874 साली इंग्रजांनी जलद दळणवळण करण्यासाठी मुंबईत ट्राम सुरू केली होती. 1874 ते 1964 पर्यंत 90 वर्ष ही ट्राम मुंबईची सेवा करत होती. हळू हळू लोकल ट्रेन ने तिची जागा घेतली.  मुंबईच्या विकासात मैलाचा दगड ठरलेली ट्राम ची हेरिटेज आठवण म्हणून मुंबई महापालिकेने, *छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस* (CSTM) जवळील *भाटिया उद्यनात* *ट्राम ची प्रतिकृती उभारण्याचा प्रोजेक्ट तयार केला.* अनके कंपन्यानी हा प्रोजेक्ट करण्यास असमर्थता धाकवली. महापालिका हे काम बिडींग पद्धतीने देते आणि अनेकांनी यात भाग घेतला नाही,  शेवटी हे आव्हान घेतले ते  *गोळे कन्स्ट्रकॅशन कंपनीने* एकटे सिंगल बीडर म्हणून हे काम या कंपनीला मिळाले, यात काम चुकले तर भुर्दंड भरायचा धोका असतो, पण न कचरता ...

तरस/लकडबंगा/ Hyana

           *तरस/लकडबंगा/ Hyana* जंगलाचा राजा सिंह मग वजीर वाघ, मग बाकीचे महाबली चिता, बिबट्या, जागवार(jagwar) हत्ती, गेंडा, रान-म्हशी असे काहीसे आपल्याला माहीत असते किंवा सर्वसाधारण सांगितले जाते.  या सर्वांना पुरून उरतो आणि त्यांच्या हद्दीत राहून स्वतःचे अस्तित्व टिकवतो तो प्राणी म्हणजे तरस, हिंदीत त्याला लकडबंगा म्हणतात आणि इंग्लिश मध्ये Hyana.  सिंह,वाघ, चिता, बिबट्या यांच्या कडे धारदार पंजे असतात, मोठे सुळे असतात, वेग असतो, चपळता असते, शरीर लवचिक असते, चिता सोडून बाकी झाडावर चढू शकतात. या सर्व प्राण्याकडे शिकार करण्यासाठी वरील नैसर्गिक गुण असतात. तरस या प्राण्याकडे वाघासारखे पंजे आणि नख्या नसतात, वेग नसतो, शरीर लवचिक नसते, झाडावर चढू शकत नाही.  त्याच्याकडे असते मजबूत जबडा, मगरी सारखीच घट्ट पकड आणि सर्वात महत्वाचे समूहाची एकी.  सिंहाला सर्वात जास्त टक्कर कोण देत असतील तर हे तरस. बरं याना शिकार करता येते आणि दुसऱ्याची ओढून पण घेता येते. संधी कशी साधायची हे याला पक्के माहीत असते, कधी कधी एकटा तरस फिरत असेल आणि याला चिता  शिकार करता...

संस्कृती

                        *संस्कृती* वडीलधारी माणस नेहमी म्हणत असतात, आपली संस्कृती जपा, परंपरा जपा. त्याचे महत्व आज समजतंय. भारतावर असंख्य स्वाऱ्या झाल्या. अब्जो ची संपत्ती लुटून नेली, अनेक मुस्लिम टोळीवाले आले आणि येथील संपत्ती, सोने घेऊन गेले. पण आपल्या माणसांनी जपली ती संस्कृती. ती ते संपवू शकले नाहीत. काल अफगाणिस्थान चे हाल बघून जाणवले, यांनी एवढे लुटले पण आज जगायला तरसत आहेत. अफगाणिस्थान च्या राष्ट्रपती भवनात अहमद शाह अब्दाली चा फोटो आहे, ज्याने त्याच्या माणसांसाठी भारतावर स्वाऱ्या केल्या. आणि आज तीच मानस आपापसात लढून मरत आहेत. माझा धर्म स्रेष्ठ आणि तोच वाढला पाहिजे म्हणणारे आज स्वतः चे जीवन संपवत आहेत. जर अब्दाली ने येथून संपत्ती सोबत संस्कृती, येथील सहिष्णुता, उदारपणा नेला असता, तर आज, सिरिया, अफगाणिस्थान, इराण, पाकिस्थान सारखे जगाला डाग नसते लागले.  म्हणून आपली संस्कृती जपा, ही एकपिढीकडून दुसऱ्या पीढिकडे जाणे गरजेच आहे.  आज भारत परत जागतिक महासत्ता बनत आहे, आर्थिक उलढालीचा झरा बनला आहे. जे लुटारू म्हणून जगले ते...