Posts

Showing posts from June, 2020

पेरणीच्या काळ

         पेरणीच्या हंगाम ज्ञानदेव प्रमाण निवृत्ती देई ज्ञान, ज्ञानदेव प्रमाण.. निवृत्ती देई ज्ञान... निवृत्ती देई ज्ञान...  आषाढी सप्ताह चा आज प्रारंभ झाला, यानिमित्त गावात अतिषय भावमय असे भजन झाले, खूप दिवस झाले खूप काही लिहायचे बाकी राहिलंय,  आज वरील अभंग ऐकला आणि मन प्रसन्न झाले. 28 वर्ष नंतर पहिल्यांदा असे वातावरण अनुभवत आहे. कोरोना चा कहर चालूच  आहे, पण आता तो विषय जुना झालाय, शेतकरी जोमाने कामाला लागला आहे, जुन च्या पहिल्या आठवड्यातच जोमदार पाऊस पडला, जमिनीला घात आला, बैलांचा आराम संपला, पाबार शेतात फिरू लागली, औती शेता-शेतात फिरू लागली, सारंग, सुंदर, नाजूक,हिरा,पोपट, राजा, सर्जा नावाचे आवाज शिवारात घुमू लागले, माती खालीवर होऊ लागली तसा तीचा सुगंध, दरवळू लागला, सोबत बैलांचा शेणाचा  एक वेगळाच वास पाबरीमागे, कुळवणीमागे येत असतो तो कुठेच परत अनुभवायला मिळत नाही,  जमिनीतील किडे वर येऊ लागले त्यांना खायला सीझन चालू झाला आणि वावरत कुंपण पडू लागलीत, बांध वरील पावसाळी रस्ते पुम्हा एकदा मळू लागले, चपला घरात राहू लागल्या आणि पाय चिखल तुडवू ल...

उफळता उत्साह

              बदललेला गाव आजकाल अनेक अशा घटना घडत आहेत की ज्या कधीच घडत नव्हत्या, ही किमया आहे कोरोना ची.  अशीच किमया आमच्या गावात घडली आणि तीन पिढ्यांचे तरुण, लहान, वयस्कर, जुने जाणते सर्व गाववाले कॉरोनात गावात आले, अडीच महिने एकत्र राहून अनेक पार्टी  पार पडल्या, सुरवातीला ज्या कोंबड्या ना कोरोना मुळे नाकारले गेले त्या कोंबड्यांवर सर्व मांसाहारी तुटून पडले, सोबत मद्यपानी ने देखील आपली व्यवस्था करून घेतलीच होती. आशा प्रकारे गावात lockdown मध्ये अनेक जुन्या नवीन गोष्टी समजल्या, अनेकानी पहिल्यांदा शेतीची अनेक कामे केली, (मी पण त्यातलाच एक), ताली धरल्या, कोणी दगडी उचलल्या, वावरे नीट केलीत, अनेकांनी झाडे पाडलीत,  जळण जमवलं, काहींनी बांध फोडले आणि आपली वावरे कशी वाढतील यासाठी निरर्थक प्रयत्न केले. काहींनी चिमण्यांची घरटी बनवून आगळा वेगळा उपक्रम राबवला.  भागात शेवटी का होईना पण ग्रामपंचायतीने रक्तदान शिबिर घेतले आणि 78 बाटली रक्तदान केले.  यासोबत गावात अनेक वाद झाले, काही घरगुती, तर काही सामाजिक आणि राजकीय असे होते आणि अजूनही चालू आह...