बर्बरिक होऊ नका
*बर्बरिक होऊ नका* आपण सर्व जाणतो की महाभारतात कौरव आणि पांडव लढले. कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही मित्रासाठी त्याची बाजू घेतली. भीष्म पितामह ना सर्व सत्य माहीत असूनही त्यांनी राजधर्म पाळला आणि कौरवांची बाजू घेतली. कृष्णाला दोघेही सारखे असून त्याने सत्य आणि धर्म आणि कर्माची बाजू घेतली. हे सर्व एका एका बाजूला होते एक-एक विचाराने लढत होते. परंतू युद्ध सुरू होण्या अगोदर कृष्णाला सर्वात आधी शस्त्र हाती घ्यावे लागले होते. जस महाभारत युद्ध होणार आहे हे समजले तसे अनेक योध्ये कुरुक्षेत्रावर येऊ लागले आणि त्यांना योग्य वाटेल त्या पक्षाकडे जात होते. *असाच बर्बरिक नावाचा महाबलशाली योद्धा जेव्हा आला आहे हे कृष्णाला समजले तेव्हा तो नक्की कोणत्या बाजूने लढणार हे जाणून घ्यायला कृष्ण त्याला भेटायला जातो.* *बर्बरिक कडे अशी शक्ती असते की तो ज्या बाजूने लढेल तो पक्ष कधीच हरणार नाही. जेव्हा कृष्ण त्याला विचारतो आपण कोणता पक्ष निवडला आहे. तेव्हा बर्बरिक म्हणतो, मला जो पक्ष हरतोय अस वाटेल मी त्या पक्षाकडून लढणार. जर कौरव कमजोर झाले तर त्यांचेकड...