प्रचार नरेंद्र पाटील शिवसेना
आज जावली सातारा भागात असे एक गाव नाही ज्या गावात माथाडी कामगार नाही. ज्या काळात गावाची लोकसंख्या वाढत होती आणि रोजगार ची संधी फक्त मुंबईत होती तेव्हा इथून गेलेल्या आपल्या बाप-चुलत्याना भावांना मुंबईत नोकरी दिली ते अण्णासाहेब पाटलांनी, फक्त नोकरी नाही तर हक्काचे घर दिले. 20-30 हजारात दिलेले घर आता 40-50 लाखांची झालेत आणि आपला गाव तालुका आणि जिल्हा आनंदात मुंबईत राहायला लागला तो याच अण्णासाहेब आणि नरेंद्र पाटील साहेबांमुळे.
आज आपल्या भागातील कोणीही मुंबई येऊ राहू शकतो कारण आपला कोणीतरी तिथं असत आपली तरुण मुले शहरात उच्च शिक्षण घेत आहेत आपला भाग सुधारत आहे तो याच कार्यामुळे.
आज काय योगायोग ज्यांनी आपली मुंबईत पोटापाण्याची व्यवस्था केली आपली मागची पिढी सुधारावली आणि येणाऱ्या पिढ्या सुधारतील याची खात्री करून दिली त्या अन्नासहबांचे चिरंजीव आपल्या विश्वासावर आपल्या भागात आपला भाग सुधरवण्यासाठी निवडणूक लढवत आहेत .
त्यांचे ऋण आपण फेडू शकत नाही पण थोडीशी परतफेड करू शकतो
राहिला प्रश्न शिवरायांच्या वांवशजांचं तर ते नेहमीच आदरणीय राहतील. एक निवडणूक त्यांचा आदर कमी जास्त करू शकत नाही . त्यांनी शिवरायांची गादी सांभाळावी. आम्ही मावळे देश आणि धर्म सेवा करतो. स्वराजचा भगवा झेंडा साताऱ्यात त्यांचे मावळे फडकवत ठेवतील.
त्यांचे समर्थकच त्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीपूर्ती वेठीस धरणार नाहीत एवढीच अपेक्षा .
जय हिंद जय महाराष्ट्र
फक्त शिवसेना
जयंत जगताप
महू, जावली, सातारा
Comments
Post a Comment