*भारतरत्न दीदी ला भावपूर्ण श्रद्धांजली*

     *भारतरत्न दीदी ला भावपूर्ण श्रद्धांजली*
इतिहासात तानसेन बद्दल आपण वाचलेलं आहे की तो किती महान सुरांचा नायक होता. आताच्या पिढीचे आपण सर्व भाग्यवान आहोत की आपण सुरांची महाराणी, अद्वितीय अशी महानायिका आपण याची डोळा पाहिली आणि याची कानी ऐकली. भविष्यात जिच्या नावाने अनेक दंतकथा तयार होतील. आम्ही  ही लहानपणी अशीच एक दंत कथा ऐकली होती. अमेरिकेचे भारतावर कर्ज वाढत चालले होते. हे कर्ज माफ करायचे असेल तर अमेरिकेनं भारताला एक प्रस्ताव दिला होता की तुमची गणकोकिळा म्हणजेच भारतरत्न लता मंगेशकर याना अमेरिकेची नागरिक करा.तिच्या आवाज हा अमेरिकेचा मालकीचा आवाज असेल. भारताने तो प्रस्ताव लगेच फेटाळला. कथेचा भाग सोडला तर हे कळते की हा आवाज की अमुल्य आहे. आज माई आपल्यात शरीराने नाहीत पण आवाजाने आजारामर झाल्या आहेत.
"ये मेरे वतन के लोगो जरा आँख मे भरलो पाणी" हे देशभक्ती गीत त्यांच्या आवाजात ऐकून शहराला नाही असा भारतीय सापडणार नाही.
आणि आज परत एकदा दीदी ने जगाला निरोप देऊन आपणा सर्वांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
*भारतरत्न लता मंगेशकर (दीदी) याना भावपूर्ण श्रद्धांजली.*

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)