सोशल मीडियाची ताकत
सोशल मीडियाची ताकत
सोशल मीडिया वर बरीच टीका होते की इथे काहीही कंटेंट टाकून फक्त पब्लिसिटी मिळवली जाते. वयक्तिक आयुष्य काही राहत नाही. वैगरे वैगरे.. पण परवा याच सोशल मीडियाने, पोलिसी आणि बाल न्यायालय की बाल हक्क आयोग जे काही आहे त्यांचा मोठा भ्रष्ट्राचार उघड केला. सरळ सरळ २ जणांना जागेवर चिरडनाऱ्या श्रीमंत बापाच्या अवलादीला रेड कार्पेट घालून ही व्यवस्था सोडत होती. या मागे किती मोठा पैसा घेतला असेल हे उघड होईलच कदाचित पण जर सोशल मीडिया ने इथे आवाज नसता उठवला तर २ जीव तर गेलेच पण त्यांच्या नातेवाईकांना कधीच न्याय नसता मिळाला.
सोशल मीडयामुळे न्यूज चॅनल मुळे जो सकारात्मक दबाव तयार झाला आणि सरकारला जाग आली त्याबद्दल सोशल मीडयामुळे न्यूज चॅनल चे अभिनंदन.
जयंत जगताप
Comments
Post a Comment