जीवनाचं गणित
जीवनाचं गणित सोडवत सोडवत अनेकजण जीवनपट सोडून जातात. जीवन हे बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार असा अनेक समिकरणानी भरलेलं असत. जिथे बेरीज होते तिथे वजाबाकी असतेच.. गुणाकार झाला की किती कमी भागाकार करता येईल याच्यासाठी अनेकांची पराकाष्ठा चाललेली असते. आणि इथेच मनासारखी बाकी राहिली नाही की तणावाचे हाच्चे आयुशयात ढवळाढवळ करतात.
आजच युग खूप फास्ट झालं आहे म्हणतात.. सर्व पळत आहेत त्यामुळे निवांत क्षण खूप कमी भेटत आहेत. स्पर्धा महत्वाची झाली आहे. ती गरजेची पण आहे पण महत्वाचे आहे स्वतची क्षमता ओळखून धावणे. जमेल इतकेच करा, थोडंसं ताना पण इतकं नको की तुटेल.
पैसा,शिक्षण हेच सर्वस्व नाही, नाती, मैत्री, आनंद, समाधान, मनःशांती
Comments
Post a Comment